ठाणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपयायोजना म्हणून ठाणे जिल्ह्यात टाळण्यासाठी शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर व ग्रामीण भागातील काळया पिवळया जीप अशा प्रकारची एकत्रित प्रवासी वाहतूक करणारी व्यवसायिक वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर व ग्रामीण भागातील काळया पिवळया जीप मधुन सर्व सामान्य प्रवासी शेअरींगव्दारे शहरांतर्गत व ग्रामीण भागात ये-जा करत असतात, त्या अनुषंगाने प्रवासा दरम्यान कोरोना विषाणू प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अशी शेअरींग प्रवासी वाहतुक करणारी वाहने जसे शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर व ग्रामीण भागातील काळ्यापिवळ्या जीप ही प्रवासी वाहतूक करणारी व्यवसायिक वाहने इत्यादी दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत पुढील आदेश होई पर्यंत बंद ठेवण्यात यावीत, असे आदेश दिले आहेत. ___ सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था/ संघटना उपरोक्त अनु.क्र.०४ मधील महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम, २०२० चे नियम ११ नुसार, भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदींनुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहील.सदर आदेशाची अंमजबजावणी आजपासून तात्काळ लागू करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्याचे कार्यक्षेत्रातील नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना अत्यावश्यक किराणा सामान, दध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तु व औषधालय वगळून तसेच हॉटेल्स, बिअरबार, वाईन शॉप हॉटेल्समधील टेक अवे/ पार्सल (घरी जेवन घेऊन जाणे) सीस वगळून दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. तसेच जी किराणामालाची दुकाने, औषधालय, दुधाची व भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तुची दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत. अशा ठिकाणी आवश्यक ती स्वच्छता ठेवण्यात यावी.
शेअर प्रवासी वाहतूकीवर बंदी